प्रवेश व शुल्क याबाबत नियम आर्थिक सवलत व शिष्यवृत्ती
-
आर्थिक सवलत व शिष्यवृत्ती
भारत सरकार शिष्यवृत्ती – वर्गीकृत जातीजमातीच्या विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती दिली जाते. सन २००३-२००४ पासून इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांनाही भारत सरकार शिष्यवृत्ती दिली जाते.
आवश्यक कागदपत्रे
- जात प्रमाणपत्र
- मा.तहसीलदार यांचा चालु वर्षाचा उत्पन्नचा दाखला
- गुणपत्रिका टि.सी.ची प्रमाणित प्रत
- छोट्या आकाराचे तीन छायाचित्रे (अलीकडील काळातील) फोटो इ) राष्ट्रीयकृत बँकेचे, पासबुक झेरॉक्स . (युजर आयडी व पासवर्ड)
- आधार कार्ड
सर्वसाधारण नियम :
- ज्या गावाचा रहिवासी असेल त्या गावाशी संबंधित तहसीलदाराचे उत्पन्न प्रमाणपत्र व जात प्रमाणपत्र रहिवासी ग्रामपंचायत चे ___असावे.
- उत्पन्नाचा दाखला आईच्या नावे असल्यास वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र व उत्पन्न दाखला पालकांच्या नावे असल्यास आई – वडिलांचे मृत्यूप्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे आवशयक आहे.
- अर्जातील सर्व माहिती अचूक व खाडाखोड न करता भरावी . शिक्षणात खंड असल्यास खंड प्रमाणपत्र (गॅप सर्टिफिकेट) १०० ___रु. बॉन्ड पेपरवर जोडावे
- दुसऱ्या महाविद्यालयातून येऊन नव्याने प्रवेश घेतला असेल तर संबंधित जिल्ह्याच्या समाजकल्याण कार्यालयातून कॉलेजमधुन शिष्यवृत्ती मंजुरी प्रमाणपत्र आणणे आवश्यक आहे.
- शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्याने राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडणे आवश्यक आहे . त्याशिवाय प्रवेश घेता येणार नाही.
- प्रवेश घेतेवेळीखाते क्रमांक देणेव अर्जासोबत शिष्यवृत्ती अर्ज भरणे आवश्यक आहे.
- विद्यार्थ्यांना बँकेमार्फत मोबाईलवर संदेश दिला जात असल्याने विद्यार्थ्याने स्वत:चा चालु मोबाईल क्रमांक देणे आवश्यक आहे अपंग शिष्यवृत्ती नियम
- योग्य त्या वैद्यकिय अधिकाऱ्यांचा दाखला अपंग प्रमाणपत्रासह (अंपगत्वाची टक्केवारी ४०% पेक्षा जास्त)
- उत्पन्न प्रमाणपत्र (तहसीलदार यांचे) * अंपगत्व ओळखूयेईल अशा प्रकारचे छायाचित्रे
- मागील वर्षाची गुणपत्रिका (४०% अधिक गुणांची टक्केवारी)
अपंग शिष्यवृत्ती नियम
- योग्य त्या वैद्यकिय अधिकाऱ्यांचा दाखला अपंग प्रमाणपत्रासह (अंपगत्वाची टक्केवारी ४०% पेक्षा जास्त)
- उत्पन्न प्रमाणपत्र (तहसीलदार यांचे)
- अंपगत्व ओळखूयेईल अशा प्रकारचे छायाचित्रे
- मागील वर्षाची गुणपत्रिका (४०% अधिक गुणांची टक्केवारी)
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत किमान ४० टक्के गुण असणे आवश्यक आहे.
-
ओळखपत्र
महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याने आपले ओळखपत्र घेणे आवश्यक आहे . त्यावर स्वत : चे अलीकडे काढलेले छोट्या आकाराचे छायाचित्र (फोटो) असणे आवश्यक आहे. ओळखपत्रावर प्राचार्य अथवा उपप्राचार्य यांची स्वाक्षरी असावी.ओळखपत्र एका वर्षासाठीच वापरता येईल.
-
उपस्थिती
प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याने त्या वर्गाची परीक्षा देण्यासाठी तसेच सर्व उपक्रमात सहभाग घेण्यासाठी किमान १००% उपस्थिती असणे आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांसाठी हजेरी ७५ % पेक्षा कमी असेल त्या विद्यार्थ्यास परीक्षेस बसता येणार नाही. प्रत्येक विद्यार्थ्याने तासिका, प्रात्यक्षिक, स्वाध्याय, वर्गचाचणी, घटक चाचणी, सराव परीक्षाव वार्षिक परीक्षा तसेच अभ्यासविषयक इतर सर्व उपक्रमांसाठी उपस्थित राहणे आवश्यक आहे.
-
स्थलांतर प्रमाणपत्र
विद्यार्थ्याने स्थलांतर प्रमाणपत्रासाठी ग्रंथालय व संबंधित विभागातून बेबाकी प्रमाणपत्र पूर्ण करुन ठराविक शुल्कासह अर्ज कार्यालयात जमा करावा . अर्ज केल्याच्या ७ दिवसानंतर प्रमाणपत्र देण्यात येईल.स्थलांतर प्रमाणपत्र विद्यार्थ्यांशिवाय कोणाकडेही देता येणार नाही. स्थलांतर प्रमाणपत्रासाठी विद्यार्थ्यांकडे स्वत:चे ओळखपत्र असावे.
-
विद्यार्थ्यांसाठी ई-सुविधा
महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांसाठीई-सुविधा या कार्यक्रमांतर्गत वर्षभर शैक्षणिक एम.एम.एस. जसे वेळापत्रक , परीक्षा दिनांक , परीक्षेचे पेपर इ. माहिती विद्यार्थ्यास दिलेल्या मोबाईलद्वारे पुरवली जाते. प्रत्येक विद्यार्थ्याला एम.के.सी.एल. च्या वतीने एक लॉगइन , आय.डी. व पासवर्ड दिला जाणार असून त्या त्या विद्यार्थ्याचा बायोडाटा इंटरनेटवर ऑनलाईन असेल व विद्यार्थी त्याची माहिती स्वत : अद्ययावत करु शकेल.